धुळे- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांच्या नियोजनातून शुक्रवारी (ता. २५) दुपारी वालखेडा (ता. शिंदखेडा) येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले.