कापडणे- खानदेशात आखाजीच्या सणाला अनन्य साधारण महत्व असते. आखाजीला पूर्वजांची आगारी आमरस पुरणपोळीने टाकली जाते. आखाजीपासूनच बहुतांश आमरस खाण्याला सुरवात करीत असतात..मंगळवारी (ता. २९) आखाजीनिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा आंबे विक्रेत्यांनी फुलल्या. आंब्यांची मोठी विक्री झाली. बादामसह केशर आंब्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले..खानदेशात आखाजीला घरोघरी पूर्वजांची आगारी टाकण्याची परंपरा आहे. यासाठी पुरणाची पोळी आणि आमरसाला मोठे महत्व आहे. डेरगे भरण्यासाठीही आमरसच आवश्यक असतो. आखाजीपासूनच आमरसच्या सेवनास प्रारंभ होतो. परिणामी, आंब्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली. बाजारपेठांमध्ये ऐंशी टक्के आंबा विक्रेते दाखल झाले होते. .बादाम आंब्याचा दर प्रतिकिलो सत्तरपासून ते शंभरपर्यंत होता. तर केशरी आंब्याचा दर प्रतिकिलो शंभरपासून दीडशेपर्यंत होता. सर्वसामान्य ग्राहक बादामी आंबा, तर नोकरवर्ग केशरी आंबा खरेदीस प्राधान्य देत होते. आखाजीनंतर आंब्याचे दर कमी होतील, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.