Dhule News : जिल्ह्यात आतापासूनच गंभीर पाणीटंचाई; धरणांवरील अनधिकृत वीजपंप हटवा

Dam
Damesakal

Dhule News : धुळे जिल्ह्यात या वर्षी पावसाने मोठी हुलकावणी दिली आहे. खरीप हंगाम २० टक्केही हाती आलेला नाही. मुसळधार आणि सातत्यपूर्ण पाऊस झालाच नाही. पांझरा सोडल्यास इतर नद्या कोरड्याच राहिल्या. अक्कलपाडा व साक्री तालुक्यातील तीन धरणे सोडल्यास जिल्ह्यातील सर्वच धरणे आणि प्रकल्पांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.

शेतकऱ्यांचे अनधिकृत वीजपंप जलसाठा कमी करीत आहेत. जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सर्वच धरणांवरील अधिकृत व अनधिकृत वीजपंप हटविण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.(already severe water shortage in district dhule news )

जिल्ह्यात २८ जूनला पावसाचे आगमन झाले. एक महिना उशिरा पेरण्या झाल्या. १२ जुलैनंतर पावसाने पुन्हा ब्रेक दिला. जुलैच्या उत्तरार्धात थोडाफार झाला. ऑगस्ट तर पूर्णच कोरडा काढला. तब्बल ३५ दिवसांच्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले. तोपर्यंत खरीप पिके ८० टक्के करपून जळाली. किमान २० टक्के एवढे तुटपुंजे उत्पादन निघाले.

पाऊस अल्प झाल्याने नदीनाले कोरडे राहिले. लहान-मोठे बंधारे, धरणे, प्रकल्प यांच्यातील साठा ४०-५० टक्क्यांच्या आत आहे. विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी आतापासूनच खालावत चालली आहे. पुढील पावसाळा अद्याप आठ महिने आहे. तोपर्यंत पाणीटंचाईचा सामना कसा करावा, हा शासन आणि प्रशासनापुढचा प्रश्न असणार आहे. अशा स्थितीत आतापासूनच उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे. पण प्रशासनाने अद्यापही संभाव्य पाणीटंचाई गांभीर्याने घेतलेली नाही.

जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी पुरमेपाडा धरण, देवभाने धरण, सातपायरी, गोंदूर तलाव, निमडाळे धरण, लामकानीजवळील धरण, अमरावती धरण, वाडीशेवाडी प्रकल्प, सोनवद प्रकल्प मोठा हातभार लावत असते. या धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. टंचाई निवारण्यासाठी या धरणांकडे आतापासूनच लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याचशा धरणांवर बागायतदार शेतकऱ्यांचे वीजपंप १६-१६ तास सुरू आहेत. दररोज हजारो लिटर पाण्याचा उपसा होत आहे.

Dam
Dhule News : वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या दबावाने माझ्यावर वाढीव कलमे : आमदार शाह

हे वीजपंप असेच सुरू राहिल्यास जानेवारीपर्यंत ही धरणे कोरडी पडतील. या धरणांवर अवलंबून गावांमध्ये म्हणजे जिल्ह्यातील ७५ टक्के गावांमध्ये जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. १९७२ च्या दुष्काळापेक्षा भयावह अवस्था असेल. हे वीजपंप तत्काळ बंद करावेत. प्रशासनाने अनधिकृत वीजपंपासह केबलही जमा कराव्यात. दंड ठोठवावा. तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

लोकप्रतिनीधी होतील का जागे?

पाणीटंचाई निवारण्यासाठी तत्काळ निधी मंजुरीसाठी व कामाचा ठेका मिळविण्यासाठी बरेचशे लोकप्रतिनिधी माहीर आहेत. त्यांनीही संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी लक्ष घालावे, अशी अपेक्षा जिल्हाभरातून होत आहे.

धरणांधील पाणीसाठा (टक्क्यांत)

कनोली : ४८.०५

बुराई : ७२.५५

सोनवद : १९.६४

वाडीशेवाडी : १९.१७

अमरावती : ००

मुकटी : ९.१३

धुळे लघुप्रकल्प (४४) : ३६.२५

Dam
Dhule News : चौकशीस तक्रारदार आमदार शाह 6 वेळा राहिले अनुपस्थित : संजय बारकुंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com