भुसावळ- उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, तापमानात मोठी वाढ होत आहे. प्राण्यांची अन्न-पाण्यासाठी शोधाशोध सुरू झाली आहे. भुसावळ शहरातील डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गायी, म्हशींचा कळप अन्न शोधताना दिसून येत आहे. .प्लॅस्टिक, कुजलेले अन्न, काचांचे तुकडे असलेल्या घातक कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये अन्नाचा शोध घेणाऱ्या या प्राण्यांचे दृश्य मन हेलावून टाकत आहे. यासाठी पालिकेची यंत्रणा कार्यरत असली तरी कितपत सक्षम आहे, हे यावरून दिसून येते. गायींसारख्या मुक्या जनावरांना पोटाची भूक भागविण्यासाठी या विषारी कचऱ्याकडे वळावे लागत आहे..भुसावळ शहरातील गोळा करून आणलेल्या डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात अन्नाच्या शोधात गोवंश आहे. त्यांच्या खाण्यास प्लास्टिक किंवा प्लास्टिकचे अंश त्यांच्या पोटात जात आहे. मात्र त्यांनी सेवन केलेल्या प्लास्टिकमुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, अशी परिस्थिती निर्माणच होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपायांची आवश्यकता आहे. .प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असले तरी नागरिक जागे असूनही गाढ झोपेतच आहेत. कचरा व्यवस्थापन केवळ सरकारी जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकानेही आपल्या कृतीकडे लक्ष दिले पाहिजे. सामाजिक सजगता आणि जबाबदारीची जाणीव अशा समस्या सोडविण्यासाठी अत्यावश्यक आहे. शहरात जामनेर रोडलगत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामागे खेडी रस्त्यावर कचरा संकलन केंद्र आहेत. या कचरा संकलन केंद्रावर बेजबाबदार नागरिकांनी कचरा गाडीत प्लास्टिकच्या पिशव्यातून शिळे अन्न, भाज्या, पालापाचोळा टाकताना आढळून येते. .शहराच्या विविध भागांतील भाजीबाजारासारख्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या दिसून येत आहेत. भाजी बाजारातील पालापाचोळा आणि प्लास्टिक सर्व डंपिंग ग्राऊंडवर गोळा केले जात आहे. परिणामी, पालापाचोळा खाण्यासाठी आलेल्या गायी, म्हशी प्लास्टिकही खात आहेत. .अनेक नागरिक गायींना नैवद्य प्लास्टिकच्या पिशवीतून देतात. शहरातील बहुतांश सभागृहाच्या परिसरात वापरलेले प्लास्टिकचे द्रोण, चमचे आदी पसरलेले दिसते. प्लास्टिक कव्हर असलेल्या कागदी पत्रावळ्या विविध पदार्थांची चव किंवा गंध असल्याने गायी, म्हशी त्याकडे आकर्षित होतात. यात द्रोण, चमचेही अनेकदा जनावरे गिळून घेतात. त्यामुळे वर्षाला शेकडो जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे या जनावरांना विविध रोगांची लागण देखील होत आहे..समस्यांच्या मुळाशी जाण्याची गरजबेजबाबदारपणे प्राण्यांना अन्न न दिल्यास ते उपाशी राहतात. त्यांना शारीरिक त्रास होतो आणि त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्राण्यांना स्वच्छ ठिकाणी न ठेवल्यास, त्यांना किटाणू आणि रोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. पशुप्राण्यांना मारल्यास किंवा त्यांना वाईट वागणूक दिल्यास, ते शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करतात. प्राण्यांना धोकादायक ठिकाणी सोडून दिल्यास ते जखमी होऊ शकतात किंवा त्यांना अपघात होण्याची शक्यता असते. बेजबाबदारपणाने जनावरांच्या जीवावर गंभीर परिणाम होतो. ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जनावरांच्या कल्याणासाठी नागरिकांनी तरी नेहमी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.