बीएचआर रायसोनीचे ठेवीदारांचा 31 मेला जळगावात राज्यव्यापी आक्रोश मोर्चा

BHR RISONI DEPARTMENT OF 31 DECLARATIONS Statewide Arochha Morcha in Jalgaon
BHR RISONI DEPARTMENT OF 31 DECLARATIONS Statewide Arochha Morcha in Jalgaon

येवला : गेल्या चार वर्षांपासून ठेवींच्या मुदती केव्हाच संपल्या असून, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट  क्रेडिट सोसायटीतून येथील ठेवीदारांचे १९ कोटी रुपायांच्या ठेवी गुंतलेल्या आहेत. या ठेवी परत मिळवण्यासाठी येवल्यासह महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण, थेट मोर्चासह अनेक आंदोलने झाली. जळगावच्या मुख्य शाखेत प्रशासक नेमूनही पैसे मिळत नाही. यामुळे हवालदिल व त्रस्त झालेल्या ठेवीदारांनी अवसायक, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना जागे करण्यासाठी थेट जळगाव येथे गुरुवार (ता.३१) आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे.

जळगाव बसस्थानक शेजारील महात्मा गांधी उद्यान येथून मोर्चा निघणार असून, ठेवीदारांनी याठिकाणी जमावे असे आवाहन अशोक मांडरे, संजीव सोनवणे यांनी केले आहे. ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह कशा पद्धतीने मिळविता येतील याबाबत आता पुन्हा विचारमंथन सुरू झाले आहे.सर्वदूर कोट्यवधी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या रायसोनी पतसंस्थेचे शहर व तालुक्यात एक हजार २०० ठेवीदार असून १९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या ४ वर्षांत येवल्यात एकदिवसीय उपोषणासह अनेक आंदोलने झाली. जळगाव येथे तीनशे ठेवीदारांचा मोर्चादेखील निघाला, यात येवल्याचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता, परंतु यश आले नाही. राज्य सरकारदेखील याबाबत हतबल झाल्याने ठेवीदारांनी दिल्लीपर्यंत धाव घेतली.

येथील संजीव सोनवणे, प्रल्हाद कोतवाल, सुभाष विसपुते, कृष्णा शिंदे, प्रताप देशमुख, विजय सानप, विनोद गोसावी, गुमानसिंग परदेशी, सोमनाथ खंदारे, प्रतिबाला पटेल, अविनाश देसाई, राजू क्षत्रिय, विलास शिंदे यांच्यासह अनेक ठेवीदार यासाठी पाठपुरावा व संघर्ष करीत आहेत. ठेवीच्या भरवशावर मुला-मुलींचे शिक्षण, आजारपण, लग्न ही सारी कामे लांबणीवर पडली आहेत. 

आता अखेर या ठेवीदारांनी थेट पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री यांना साकडे घालण्याचे नियोजन या बैठकीत  केले आहे. आम्हाला आमच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन या ठेवीदारांकडून केले आहे. बुडतीच्या डोहात फसल्याने त्रस्त झालेल्या ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा मिळावा म्हणून ठेवीदार संघटना गेल्या चार वर्षांपूर्वी स्थापन केली. या दृष्टीने योजनाबद्ध कार्यक्रम आखून उपोषण व संघर्षाची भूमिका घेतली होती, परंतु नियोजनबद्ध ठोस कृतियुक्त पाठपुरावा झाला नाही.

कृतियुक्त कार्यक्रम तयार करून संघर्ष करण्याची तयारी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक ठेवीदार आजाराने बिछान्यावर पडून आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावयाची आहे. पण सर्व पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडाले असल्याची त्यांना खात्री झाली आहे. संघर्षातून कष्टाचे पैसे परत मिळविण्यासाठी अखेरचा निर्णायक लढा देणार असल्याचा संकल्प ठेवीदारांनी केला आहे. संस्थेच्या ठेवी बुडण्याच्या धास्तीने काहींनी आम्ही आत्महत्या करावी काय? त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. पैसे बीएचआरमध्ये ठेवले गेले आणि हे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत. केवळ ८० टक्के रक्कम का होईना परत द्या अशा संतप्त भावना बैठकीत व्यक्त केल्या आहेत.

ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष संजीव सोनवणे, उपाध्यक्ष गुमानसिंग परदेशी, सचिव प्रल्हाद कोतवाल, रंगनाथ खंदारे, अविनाश देसाई, सुभाष विसपुते, राजेश रामचंद्र पटेल, सुरेश हिराचंद पटेल, ईश्वर सूर्यवंशी, रमेशचंद्र राठी, इक्बाल पटेल, मिलिंद दातरंगे, वसंत गोसावी, सुभाष साळवे यांच्यासह ठेवीदार एल.झेड. वाणी, नामदेव कोल्हे, सदानंद बागुल यांच्यासह शेकडो ठेवीदार आक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती संजीव सोनवणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com