जळगाव- मध्य रेल्वेने होळी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते बनारस, पुणे ते दानापूर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते दानापूर, मुंबई ते महू दरम्यान अतिरिक्त होळी विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जाणार आहेत. विशेष रेल्वेगाड्या अशा : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बनारस होळी विशेष (०१०१३) रेल्वेगाडी गुरुवारी (ता. १३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री साडेदहाला सुटेल आणि बनारस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे सव्वापाचला पोहोचेल.