VIDEO : सत्तास्थापनेत व्यस्त नेत्यांनो...इथं रोजच सरण रचण्याची वेळ आलीय

vaghera farmer.png
vaghera farmer.png

नाशिक :  वाघेरा परिसरात अवकाळी पावसाने आज दिवसभर पावसाने हैदोस घातला असून सोंगणीला आलेल्या भाताच्या पिक डोळ्यासमोर पावसात उध्वस्त झाले. ऐन तोंडी आलेला घास हिसकवलयागत शेतीचे वाटटोळे झाल्याने अन्नधान्यच पाण्यात भिजल्याने ऐन महागाईत घरदाराचा खर्च कसा भागवायचा? मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कुठून आणायचा?या अवकाळीने आमचे जगणेच मुश्किल केले,लोकांचे देणेघेणे कसे फेडायचे? हाच कसोटीचा प्रश्न आम्हाला छळतोय,मागील आठवड्यात आमदार खासदारांचे दौरे झाले,पंचनामे झाले,मात्र पिकांच्या नुकसानीचे कुठलीही मदत आमच्या हाती येईल याचा आम्हाला विश्वास राहिला नसल्याने आम्ही प्रचंड चिंताग्रस्त आहोत असा सवाल,उद्विग्नय प्रतिक्रिया वाघेरा येथील नुकसानग्रस्त भात उत्पादक तरुण शेतकरी विष्णू माळेकर यांनी दैनिक सकाळच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

"आम्हालाच आमचे सरण रचण्याची वेळ​
 मागील महिन्यातील अवकाळी पावसाने आमचे शेत झोडपले,त्यात भाताचे,शेतातील टोम्याटोचे मोठे नुकसान झाले,त्यातून सावरण्याचा आटापिटा सुरू असताना (ता.८) रोजी पुन्हा अवकाळी पावसाने सतत धार लावली, त्यामुळे सोंगणीला आलेले उभे भात शेतातच पाण्यात भिजत आडवे झाले. भाताच्या वाळलेल्या कणीसाला पुन्हा यामुळं फुटवा येईल,,"आम्हालाच आमचे सरण रचण्याची वेळ येऊन ठेपल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.अवकाळीने भाताचे मोठे नुकसान केल्याचे वाघेरा भागातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांनी सकाळ शी बोलताना शासनाकडून मदतीची शास्वती नसल्याचे सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com