Dhule News : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवार (ता. २१)पासून बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली. इंग्रजीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला. परीक्षार्थींना दहा मिनिटे जास्ती वेळ मिळाला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील तीन परीक्षा केद्रांना भेटी देत पाहणी केली.
जिल्ह्यातील ४६ केंद्रांमध्ये २४ हजार ३०९ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारावीच्या पहिल्या इंग्रजीच्या पेपरला सकाळी अकराला सुरवात झाली. (Dhule Commencement of 12th Exams)
परीक्षा केंद्रांना भरारी पथकांनी भेट देत पाहणी केली. काही संवेदनशील केंद्रांवर पथक ठाण मांडून होते. पोलिस अधीक्षक धिवरे यांनी नॅशनल ऊर्दू हायस्कूल, अभय उच्च माध्यमिक शाळा आणि जिजामाता उच्च माध्यमिक शाळा परीक्षा केंद्राला भेट दिली.
काही केंद्र परिसरात कॉपीचा खच दिसून आला. जिल्ह्यात ११ केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाच भरारी पथके तसेच पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले. काही केंद्रांवर परीक्षार्थींना गुलाबपुष्प देत त्यांचा शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हरीश माळी, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, महानगरप्रमुख मनोज जाधव, शहरसंघटक जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे यांनी हुरूप वाढविला. (Latest Marathi News)