येवला- शहरभर कोणीही अन् कोठेही वाटेल तेथे अतिक्रमण करून दुकाने थाटत असल्याने गेल्या महिनाभरापासून पालिका ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. यापूर्वी कारवाई केल्यावरही सोमवारी (ता.२४) अनेक व्यावसायिकांनी पुन्हा महामार्गावर दुकाने थाटल्याने मनमाड-अहिल्यानगर महामार्गावर विंचूर चौफुली ते फत्तेबुरूज नाका यादरम्यान पालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत अतिक्रमण हटविले. यात दोन टपऱ्या व तीन हातगाड्या पालिकेने जप्त केल्या आहेत.