
जळगाव: शहरातून जाणाऱ्या महामार्गाची बिकट अवस्था झाली आहे. खोटेनगर ते कालिका माता चौकापर्यंतच्या सात किलोमीटरच्या टप्प्यात महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात घडत असून, महामार्गावरुन धूळही उडत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पावसाळ्यानंतर महामार्गाची दुरुस्ती करण्यासंदर्भात कळविण्यात आले. मात्र, पावसाळा संपून दोन- तीन आठवडे उलटले, तरीही दुरुस्ती न झाल्याने जळगावकरांची दिवाळी महामार्गांवरील खड्ड्यांमध्येच जाणार आहे.