Sand
sakal
जळगाव: जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर अद्यापही जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे चित्र असून, वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान अवैध गौण खनिज वाहतुकीची ५८१ प्रकरणे समोर आली असून, प्रशासनाने सात कोटी ५६ लाखांचा दंड आकारला होता. मात्र, त्यापैकी केवळ चार कोटी ७६ लाख रुपयांची वसुली झाली. या कालावधीत ५७३ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, ४३ गुन्हे दाखल करून १९ संशयितांना अटक केली आहे.