जळगाव: राज्यातील पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत दरमहा पंधराशे रुपयांप्रमाणे लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत आर्थिक उत्पन्न प्राप्तिकर तसेच बँक खात्याशी ई-केवायसी जोडणीनुसार पडताळणी होऊन अपात्र लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच केली जात आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ नको म्हणून विभागाकडे अर्ज केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील ११ हजार १७५ महिला भगिनींचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.