जळगाव- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पाठ्यपुस्तके देण्याचा गवगवा सहा महिन्यांपासून सुरू आहे. वास्तविक, सोमवारी (ता. १६) निम्म्या विद्यार्थ्यांना पुस्तक न मिळू शकल्याने त्यांना नाराज होऊन घरी परतावे लागले. पालकांनी शाळांशी संपर्क केला.