Water Crisis
sakal
जळगाव: जलसंपदाच्या पाटबंधारे विभागांतर्गत वाघूर धरण येते. या धरणातून जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जात असून, महापालिकेची जलसंपदा विभागाची तब्बल १४ कोटी ६८ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी असून, पाटबंधारे विभागाने २७ मार्चपर्यंत ही थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जळगावकरांवर जलसंकट उद्भवण्याची शक्यता आहे.