जळगाव- मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या अनेक राजकीय नेत्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा ग्रामपंचायत सदस्य अथवा सरपंच पदापासूनच झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. राजकारणात महिलांसाठी किमान ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ६० ग्रामपंचायतींत, तर अन्य तालुक्यांत सर्व ५८३ सरपंच पदाच्या सोडतीत महिलांच्याच हाती गावाच्या प्रमुखपदाची ‘लॉटरी’ लागल्याचे चित्र आहे.