म्हसदी- गेल्या अनेक वर्षांपासून साक्री तालुक्यातील सदन भाग असलेल्या काटवान भागातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे..म्हसदी ते दातर्ती शेवाळी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर मार्गस्थ होणारे वाहनचालक नाके मुरडतात. म्हसदीहून निघणारे खासगी वाहनचालक सरळ चिंचखेडे-अक्कलपाडामार्गे साक्री जाण्यास पसंती देतात. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे..साक्री तालुक्यातील अनेक उपरस्त्यांची वाट लागली आहे. महामार्गाला जोडलेल्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, सर्वाधिक वाईट परिस्थिती म्हसदी ते शेवाळी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची आहे. यासंदर्भात पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यत पाठपुरावा करण्यात आला. .लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. विकास तर सोडाच दळणवळणाचा मुख्य भाग असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा साधा प्रश्न सुटत नसल्याचे चित्र आहे. साक्री ते म्हसदी, म्हसदी ते छाईल, बेहेड ते विटाई या दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारे व अनेक उद्योगधंद्यासाठी महत्त्वाचे असून, दहा ते बारा वर्षांपासून या रस्त्यांचे काम होणार असल्याचे सांगितले जाते. परंतु, कामाला मुहूर्त लागलेला नाही. अनेक लोक रस्त्यामुळे या भागात येण्याचे टाळतात. उद्योगवाढीला ब्रेक लागला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
म्हसदी- गेल्या अनेक वर्षांपासून साक्री तालुक्यातील सदन भाग असलेल्या काटवान भागातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे..म्हसदी ते दातर्ती शेवाळी फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर मार्गस्थ होणारे वाहनचालक नाके मुरडतात. म्हसदीहून निघणारे खासगी वाहनचालक सरळ चिंचखेडे-अक्कलपाडामार्गे साक्री जाण्यास पसंती देतात. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे..साक्री तालुक्यातील अनेक उपरस्त्यांची वाट लागली आहे. महामार्गाला जोडलेल्या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, सर्वाधिक वाईट परिस्थिती म्हसदी ते शेवाळी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची आहे. यासंदर्भात पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यत पाठपुरावा करण्यात आला. .लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. विकास तर सोडाच दळणवळणाचा मुख्य भाग असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा साधा प्रश्न सुटत नसल्याचे चित्र आहे. साक्री ते म्हसदी, म्हसदी ते छाईल, बेहेड ते विटाई या दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारे व अनेक उद्योगधंद्यासाठी महत्त्वाचे असून, दहा ते बारा वर्षांपासून या रस्त्यांचे काम होणार असल्याचे सांगितले जाते. परंतु, कामाला मुहूर्त लागलेला नाही. अनेक लोक रस्त्यामुळे या भागात येण्याचे टाळतात. उद्योगवाढीला ब्रेक लागला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.