conflict
sakal
जळगाव: राज्यात सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाला सुरवातीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. यामुळे गावातील तंटे गावातच सोडविले जात होते. यामुळे वादाचे प्रमाण कमी झाले होते. शिवाय काही वाद उद्भवले तरी ते समितीमार्फत सोडविले जात असल्याने पोलिसांपर्यंत वाद पोहोचत नव्हते. पण, आज या समित्या कार्यरत नसल्याने गावातील तंटे वाढू लागले आहेत. यामुळे गावांमधील वाद वेशीबाहेर येऊन ग्रामपंचायत विभाग आणि पोलिसांपर्यंत पोहोचत आहेत.