कृषी दिनानिमित्त गावकऱ्यांनी केला आदर्श शेतकऱ्यांचा गौरव

सुमारे दोनशे शेतकरी कुटुंबे असून मुबलक पाण्यामुळे नव्वद टक्के बागायती शेती आहे
कृषी दिनानिमित्त गावकऱ्यांनी केला आदर्श शेतकऱ्यांचा गौरव
Updated on

म्हसदी : कृषी दिनानिमित्त (Agriculture Day) शेतात घाम गाळून, सोनं पिकवणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा काळगाव (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) आज सकाळी 'सरपंच कृषी गौरव' पुरस्कार ('Sarpanch Krishi Gaurav'award) प्रदान करत गौरव केला. काळ्या आईची सेवा करत शेतीत यश मिळवत इतर शेतकऱ्यांना (Farmers) प्रेरणा देणाऱ्या बळीराजाचे कृषीदिनी गौरव करणारी काळगाव ग्रामपंचायत एकमेव असावी.(agriculture day kalgaown gram panchayat sarpanch krishi gaurav award)

कृषी दिनानिमित्त गावकऱ्यांनी केला आदर्श शेतकऱ्यांचा गौरव
सावद्याची कन्या झाली अब्जाधीश; तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा


फळ, भाजीपाला उत्पादक नितीन ठाकरे, कांदा उत्पादक जगन ठाकरे व पशुधन सांभाळत फळ शेती करणारे आदिवासी शेतकरी लाला अहिरे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान चिन्ह,प्रशिस्तपत्र, शाल, श्रीफळ देत गौरव करण्यात आला. तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रावसाहेब ठाकरे अध्यक्षस्थानी होते.लोकनियुक्त सरपंच तथा कृषी भुषण संजय भामरे, उपसरपंच रावसाहेब खैरनार, नरेंद्र ठाकरे, जगदीश ठाकरे, भटू भामरे, यादवराव खैरनार, गंगाराम ब्राह्मणे, रमेश ब्राह्मणे, बाजीराव ठाकरे,आदर्श शेतकरी संदिप भामरे,कैलास अहिरराव (तामसवाडी), बबन खैरनार, नितीन ठाकरे, महेश ठाकरे, रावसाहेब ठाकरे, नंदू सोनवणे, सुखदेव सोनवणे, अशोक खैरनार, प्राथमिक शिक्षक शशिकांत पाटील,मंडळ कृषी अधिकारी पी.एल.भामरे, कृषी पर्यवेक्षक जे.एल.पवार, कृषी सहाय्यक आर.आर.बारसे, ग्रामसेवक आर.एल.वाघ उपस्थित होते.

कृषी दिनानिमित्त गावकऱ्यांनी केला आदर्श शेतकऱ्यांचा गौरव
तर..दहा वर्षांनी जळगावचे तापमान चार अंशांपर्यंत खाली

कष्ट करणाऱ्यांचा गौरव..!
गावाची लोकसंख्या एक हजार 93 असून चारशे दहा हेक्टर महसूल क्षेत्र(शेत जमीन) आहे.1320 हेक्टर वनक्षेत्र आहे.सुमारे दोनशे शेतकरी कुटुंबे असून मुबलक पाण्यामुळे नव्वद टक्के बागायती शेती आहे.फळ,भाजीपाल्याची शेती करण्यात शेतक-यांचा हातखंडा आहे.आदिवासी (भिल्ल)समाज बांधवाकडेही शेती असल्याने तेही फळशेती करत असल्याचा आदर्श आहे.जेष्ठ आदिवासी शेतकरी लाला अहिरे यांच्याकडे गावरान गाई आणि शेळ्या आहेत.केवळ एका गाईपासूनच्या उत्पतीत गावात सर्वाधिक गाई त्यांच्याकडे आहेत.प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी शेतक-यांचा गौरव करत ग्रामपंचायतीने आदर्श पायंडा पाडला आहे.कष्ट करत शेती करणा-या गावातीलच शेतक-यांचा दरवर्षी गौरव करण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प असल्याचे सरपंच भामरे यांनी सांगितले.गावातील इतर शेतक-यांनी यातून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन ठाकरे,मंडळ कृषी अधिकारी भामरे,यादवराव खैरनार,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक विजय भामरे यांनी सुत्रसंचालन केले.सुरेश ब्राह्मणे,विजय सोनवणे,बाला ठाकरे,मधुकर भामरे,ज्ञानेश्वर खैरनार यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur ZP Solar Projects
Legal Action Against Fake Caste Certificates In Maval Raises Questions For Reserved Seats Ahead Of Gram Panchayat Polls
Social activist Sachin Chavan withdrew his indefinite hunger strike after the administration assured in writing that the alleged financial irregularities in Adul Gram Panchayat would be investigated and a report submitted within 15 days
Social activist Sachin Chavan has launched an indefinite hunger strike outside the Adul Gram Panchayat office in Paithan taluka, demanding an impartial inquiry into alleged financial irregularities and action against those found responsible.
Marathi News Esakal
www.esakal.com