
जळगाव : "कोरोना'ची आपत्ती सुरू असतानाही राज्यातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. टंचाई निवारण्यासाठी तब्बल 450 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात कुठेही पाणीटंचाई भासू देणार नसल्याची ग्वाही आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्यात सद्य:स्थितीत 320 टॅंकर्स सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सध्या "लॉकडाउन' सुरू असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे घरूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या खात्याचा कारभार पाहत आहेत. मे महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई भासत असते. सुदैवाने यंदा राज्यातील बहुतांश भागात मुबलक पाणीसाठा असून, जिथे नाही तिथे टॅंकरची तरतूद करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले की, राज्यभरात सध्या 474 गाव आणि 972 वाड्या, वस्त्यांमध्ये एकूण 350 टॅंकर्स सुरू आहेत. यात शासकीय 71 आणि खासगी 249 टॅंकर्सचा समावेश असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
मंत्री पाटील पुढे म्हणाले की, यंदा पाणीटंचाईच्या निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने 450 कोटींची तरतूद केली आहे. आवश्यकता भासल्यास या निधीत अजून वाढ करण्यात येणार आहे. अचूक नियोजन व निधीचा योग्य विनियोग यामुळे राज्यात कुठेही पाणीटंचाई भासू देणार नसल्याची ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली. पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे अधिकारी व कर्मचारी हे सोशल डिस्टन्सिंगसह स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेऊन योग्य पाणीपुरवठा करत असल्याची माहिती देखील गुलाबराव पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.