
शहादा : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात असले तरी आजही शंभर टक्के गावांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. शहादा तालुक्यात दीडशे ग्रामपंचायती आहेत.त्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांची तपासणी केली असता 141 ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य (हिरवे कार्ड), तर नऊ गावातील पिण्याचे पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले त्या ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. सुदैवाने तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीकडे लाल कार्ड नाही. दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांचे पाण्याचे नमुने घेण्यात आले होते हा अहवाल नुकताच आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे.त्यानुसार तालुक्यातील दीडशे ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतीचे पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त आहे. तर 141 ग्रामपंचायतींना पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठा होत असल्याचे अहवालावरून निष्पन्न झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. साथीचे आजार पसरू नये याकरिता ग्रामपंचायतींकडून ब्लिचिंग पावडरचा वापर होणे आवश्यक आहे.नागरिकांनी पाण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रामीण भागात शुद्ध पाणी मिळण्यासाठी फिल्टर चे पाणी पैसे मोजून विकत घ्यावे लागत आहे तर काही ग्रामस्थांची परिस्थिती पाहता पाण्याच्या जार विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नसून ग्रामपंचायतीच्या पाण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागते.
ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांच्या नशिबी आजारपण येत असते तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावातील पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर वापरत नसल्याचा प्रकार अनेकदा समोर येत असतो. आजही अनेक ठिकाणी नियमित ब्लिचिंग पावडर चा वापर होत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे या काळात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे या काळात नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी दूषित पाण्याची समस्या मिटलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार पसरण्याचा धोका कायम असतो.
असा ठरवतात कार्डचा दर्जा.....
संबंधीत ग्रा.पं.च्या हद्दीतील पाण्याचे नमुने घेऊन पाण्याचा दर्जा ठरविण्यात येतो त्यात पाण्याच्या दर्जानुसार संबंधित ग्रामपंचायतीला लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येते. ज्या ग्रामपंचायत मध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, त्या ग्रामपंचायतला लाल, कमी दुषित पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ग्रा.पं.ला पिवळे, तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.ला हिरवे कार्ड देण्यात येते.
पिवळे कार्ड असलेल्या ग्रामपंचायती.....
काहाटूळ,धांद्रे बु., उभादगड,चिरखान, शहाणा, वडगांव, कोळपांढरी,टेंभली (आसुस),कुरंगी तालुक्यातील या नऊ ग्रामपंचायतींकडून दुषित पाणी पुरवठा होतो यासाठी पिवळे कार्ड देण्यात आले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.