पाणी कपातीची उद्यापासून अंमलबजावणी 

residentional photo
residentional photo

नाशिक- गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा होईपर्यंत शहरात एकवेळ पाणी कपात लागु करण्याचा निर्णय शुक्रवारी महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाच्या अहवालावरून घेतला होता. त्याची अंमलबजावणी रविवार पासून सुरु होणार असल्याने एकीकडे शहरात पाऊस कोसळतं असला तरी दुसरीकडे नळांना फक्त एकवेळ पाणी येणार आहे. दारणा धरणातून पाणी उपसा बंद केल्याने त्याचा परिणाम गंगापूर धरणातून अधिक पाणी उपसावर झाला.

गंगापूर धरणातील इन्टेक वेलच्या न्युनतम पातळीपर्यंत पाणी पोहोचल्याने कपात करणे गरजेचे आहे. सध्या त्र्यंबकेश्‍वर व गंगापूर धरणाच्या लाक्ष क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतं आहे परंतू सध्या पाऊस समाधानकारक असला तरी पावसाने ओढ दिल्यास भविष्यात टंचाईचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो त्यामुळे कपात करण्याची प्रशासनाची भुमिका होती. महापौर भानसी यांना अहवाल सादर करण्यात आल्यानंतर कपातीचा निर्णय घेण्यात आला. नवीन नियोजनानुसार जेथे दोन वेळा पाणी पुरवठा होतो तेथे एकवेळ पुरवठा आज पासून होणार आहे. पुढील चार दिवसात समाधानकारक पाऊस न पडल्यास आठ दिवसातून एकदा संपुर्ण एक दिवस पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तो दिवस गुरुवारचा निश्‍चित करण्यात आला आहे. दररोज 60 दशलक्ष लिटर्स पाणी वाचविण्याचे नियोजन आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com