नाशिक- महावितरणने वीजजोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या थकबाकीदार ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनांतर्गत वर्षभरात नाशिक परिमंडळात १२ हजार २१९ ग्राहकांनी १५ कोटी रुपयाचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्ती मिळविली. ८ हजार वीज ग्राहकांनी त्यांच्या मागणीनुसार पुन्हा वीजजोडणी देण्यात देवून त्यांच्या घरांमध्ये प्रकाश पुन्हा परतला आहे.