

27th All India Marathi Christian Literary Meet Concludes in Nashik
sakal
या संमेलनात अनेक लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी भाग घेतला. साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ संपादक-लेखक उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष फादर एरॉल फर्नांडिस, वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसूझा यांची भाषणे झाली.
संमेलनाच्या मंचाला `फादर फ्रान्सिस दिब्रिटो विचारपीठ' असे नाव देण्यात आले होते. फादर दिब्रिटो यांचे २०२० साली निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच हे मराठी साहित्य संमेलन भरत होते.
फलकावर एका बाजूला फादरांचे आणि दुसऱ्या बाजूला कविवर्य कुसुमाग्रज यांची छायाचित्रे होती. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला रेव्ह. नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे नाव देण्यात आले होते.