नाशिक- केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ई-केवायसी नोंदणीसाठी एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण, मुदतवाढीनंतर आजही जिल्ह्यातील आठ लाख ५० हजार ५३ हजार ६५१ लाभार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे १ मेपासून या लाभार्थींच्या धान्यावर गंडातर येण्याची दाट शक्यता आहे.