नंदुरबार- जिल्ह्यात सर्रासपणे भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत आहे. भेसळयुक्त तेलाने बनविलेल्या फरसाणचीसुद्धा बिनधास्तपणे दुकानांवर विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळले जात आहे. या सर्व भेसळयुक्त पदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य महेंद्र चौधरी यांनी केली आहे.