वीरगाव- बागलाण तालुक्यात आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक अहवालानुसार कांदा पिकाचे सुमारे एक हजार ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, दोन हजार ३४४ शेतकऱ्यांना याचा फटका बसला.