येवला- मॉन्सूनपूर्व असूनही पेरणीलायक पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या विविध भागात शेतकऱ्यांनी मका पेरणी सुरू केली होती, मात्र दोन दिवसांपासून पावसाने उघडीप देताच पुन्हा पेरण्यांना ब्रेक लावला आहे. दरम्यान कधी नव्हे; इतका पाऊस मे महिन्यात झाला असून जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.