Iran Israel War
sakal
नाशिक: मध्यपूर्व आणि आखाती देशांत भडकलेल्या युद्धामुळे नाशिक जिल्ह्यातील ३३९ नागरिक अडकून पडले आहेत. या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून, त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारशी संपर्क साधला जात आहे. तूर्तास हे सर्व नागरिक संबंधित देशांमधील सुरक्षित निवासस्थाने तसेच हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.