cricket team
sakal
नाशिक: सलामीवीर नीरज जोशी (नाबाद १३४ धावा) आणि अनिरुद्ध साबळे (नाबाद ७४ धावा) यांच्या धुव्वाधार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्रविरुद्ध दणदणीत विजय मिळविला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब मैदान) खेळण्यात येत असलेल्या सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी (ता. १८) महाराष्ट्राने दहा गडी राखून हा सामना जिंकला.