Darna Dam
sakal
नाशिक: दारणा धरणातून गोदावरी उजव्या व डाव्या तट कालव्यांमार्फत तसेच दारणा, गोदावरी नदीलगतच्या गावांना सिंचन व बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. ते ३१ मार्चपर्यंत चालेल. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी कालव्यालगतच्या गावांमध्ये दररोज सकाळी सहा ते आठ हा दोन तासांचा कालावधी सोडून २२ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.