चिचोंडी- पालखेडचे दुसरे आवर्तन लेट झाल्यामुळे पालखेड पाण्याच्या भरवशावर लावलेली रब्बी उन्हाळ कांदा, मका, गहू ही पिके पाटपाणी लेट झाल्यामुळे एरंडगाव, चिचोंडी या परिसरात करपू लागली आहेत..दरम्यान हे पाणी एक मार्चला पाटाला प्रवाहित होणे गरजेचे होते. मात्र पालखेड कालव्याच्या ढिसाळ नियोजनामुळे हे पाणी ८ मार्चला प्रवाहित झाले. त्यातही भरीस भर म्हणून पाणी चारी नंबर ३४,३५,३६ या चाऱ्यांना तर अजूनही पाणी न आल्याने पाण्याच्या भरवशावर उन्हाळी कांदा, मका, गहू अशी रब्बी पिके पाण्याअभावी करपू लागली आहे. .दरम्यान पालखेड पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे डोळ्यासमोर महागडी खते, बी बियाणे आणि निसर्गाचा सामना करून वाचवलेही पिके जळताना पाहून शेतकरी आर्थिक संकटात लोटला गेला आहे. चारी नंबर ३४ ते ३६ या लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील पिके अक्षरशा वाढलेल्या उन्हामुळे करपू लागली आहे. दुसरे आवर्तन हे शेतकऱ्यांना एक मार्चच्या दरम्यान मिळणे अपेक्षित असताना ते तब्बल वीस दिवस लेट केल्याने या परिसरातील दहा ते पंधरा गावातील पिकांची पाण्याअभावी होरपळ होत आहे..पालखेड पाट पाण्याच्या भरवशावर चिचोंडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दोन आवर्तनाच्या भरवशावर रब्बी उन्हाळी कांदा, मका, गहू अशी पिके केली. पहिले रोटेशन लवकर सोडले तर दुसरे आवर्तन २८ फेब्रुवारी पालखेड मधून सोडणे अपेक्षित असताना ते तब्बल दहा दिवस उशिरा केले. अद्यापही चारी क्रमांक ३४,३५,३६ लाभ क्षेत्रात पाणी न आल्याने पिकांची होरपळ होत आहे. -साईनाथ मढवई, माजी उपसरपंच, चिचोंडी खुर्द.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
चिचोंडी- पालखेडचे दुसरे आवर्तन लेट झाल्यामुळे पालखेड पाण्याच्या भरवशावर लावलेली रब्बी उन्हाळ कांदा, मका, गहू ही पिके पाटपाणी लेट झाल्यामुळे एरंडगाव, चिचोंडी या परिसरात करपू लागली आहेत..दरम्यान हे पाणी एक मार्चला पाटाला प्रवाहित होणे गरजेचे होते. मात्र पालखेड कालव्याच्या ढिसाळ नियोजनामुळे हे पाणी ८ मार्चला प्रवाहित झाले. त्यातही भरीस भर म्हणून पाणी चारी नंबर ३४,३५,३६ या चाऱ्यांना तर अजूनही पाणी न आल्याने पाण्याच्या भरवशावर उन्हाळी कांदा, मका, गहू अशी रब्बी पिके पाण्याअभावी करपू लागली आहे. .दरम्यान पालखेड पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे डोळ्यासमोर महागडी खते, बी बियाणे आणि निसर्गाचा सामना करून वाचवलेही पिके जळताना पाहून शेतकरी आर्थिक संकटात लोटला गेला आहे. चारी नंबर ३४ ते ३६ या लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील पिके अक्षरशा वाढलेल्या उन्हामुळे करपू लागली आहे. दुसरे आवर्तन हे शेतकऱ्यांना एक मार्चच्या दरम्यान मिळणे अपेक्षित असताना ते तब्बल वीस दिवस लेट केल्याने या परिसरातील दहा ते पंधरा गावातील पिकांची पाण्याअभावी होरपळ होत आहे..पालखेड पाट पाण्याच्या भरवशावर चिचोंडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी दोन आवर्तनाच्या भरवशावर रब्बी उन्हाळी कांदा, मका, गहू अशी पिके केली. पहिले रोटेशन लवकर सोडले तर दुसरे आवर्तन २८ फेब्रुवारी पालखेड मधून सोडणे अपेक्षित असताना ते तब्बल दहा दिवस उशिरा केले. अद्यापही चारी क्रमांक ३४,३५,३६ लाभ क्षेत्रात पाणी न आल्याने पिकांची होरपळ होत आहे. -साईनाथ मढवई, माजी उपसरपंच, चिचोंडी खुर्द.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.