नाशिक- मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हटविल्यावर आता ‘त्या’ हॉटेलचे अतिक्रमण का काढले नाही, असा प्रश्न स्थानिक व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. एकूणच, महामार्ग प्राधिकरणाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.