Agriculture News : पावसाने बळीराजा संकटात: नाशिकमध्ये कोथिंबीर, डांगर रस्त्यावर फेकण्याची वेळ

Farmers Struggle Amid Monsoon Fury in Nashik : नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पावसामुळे पालेभाज्या व फळभाज्यांची आवक वाढली असून, दर कोसळल्याने अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीर आणि डांगर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
vegetable
vegetablesakal
Updated on

पंचवटी: शेतकरी हा कधी अस्मानी ते कधी सुलतानी संकटांनी नेहमीच घेरलेला असतो. मे महिन्यापासून सुरू असलेला पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारातच विक्रीस आल्यानंतर चायना कोथिंबिरीला प्रतिजुडी एक ते दोन रुपये व डांगराला २५ रुपये किलो दर मिळाल्याने ते फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com