सातपूर- उत्तर महाराष्ट्रातील सुमारे साडेतीन कोटी नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) अवस्था अत्यंत दयनीय असून, संपूर्ण विभागात केवळ दोन निरीक्षकांवर संपूर्ण कारभार सुरू आहे. त्यामुळे बनावट औषधांच्या निर्मितीवर आणि विक्रीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण झाले आहे. ही गंभीर बाब म्हणजे खुद्द अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जिल्ह्यातच अशी परिस्थिती आहे.