नाशिक- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी नोंदणीसाठी शेवटच्या चार दिवसांची मुदत बाकी आहे. या मुदतीत नोंदणी न केलेल्या लाभार्थींचा धान्यपुरवठा महिनाअखेर बंद केला जाईल. जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्क्यांच्या आसपास नागरिकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.