निखिल रोकडे- नाशिक: गेल्या दीड दशकापासून नाशिक- अहिल्यानगर व मराठवाडा भागात गोदावरी नदीच्या पाणीवाटपावरून सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) समन्यायी पाणीवाटपाचा नवा अहवाल आता मराठी भाषेत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या अहवालावर नागरिक व शेतकऱ्यांनी अभिप्राय व हरकती एका महिन्याच्या आत नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्राधिकरण अंतिम निर्णय घेणार आहे.