Nashik News : राज्यपाल थेट शेतात उतरले; खोरीपाड्यात ज्वारीची पेरणी करत नैसर्गिक शेतीचा संदेश!

Governor Devvrat : खोरीपाडा (नाशिक) येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन ज्वारीची पेरणी करत नैसर्गिक शेतीचा संदेश दिला. रासायनिक शेतीमुळे आरोग्य व पर्यावरणाला धोका असून नैसर्गिक शेतीच भविष्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी शेतकरी संवादात सांगितले.
Governor Promotes Natural Farming in Nashik

Governor Promotes Natural Farming in Nashik

Sakal

Updated on

वणी (नाशिक) : शेती करतांना आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, औषधे वापर होत असल्याने त्यातून जमिनीला विष दिले जात आहे. हे सर्व विष जमिनीतून पाण्याच मिसळण्या बराेबर वायुमंडळही प्रदुषीत करीत आहे. त्याचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होत असून त्यातून हद्यरोग, मधुमेह, कर्करोग यासारखे गंभीर आजारांमूळे रुग्णालये भरली जात आहे. त्यापासून मुक्तता ही नैसर्गिक शेतीच देवू शकते असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com