

Governor Promotes Natural Farming in Nashik
Sakal
वणी (नाशिक) : शेती करतांना आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, औषधे वापर होत असल्याने त्यातून जमिनीला विष दिले जात आहे. हे सर्व विष जमिनीतून पाण्याच मिसळण्या बराेबर वायुमंडळही प्रदुषीत करीत आहे. त्याचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होत असून त्यातून हद्यरोग, मधुमेह, कर्करोग यासारखे गंभीर आजारांमूळे रुग्णालये भरली जात आहे. त्यापासून मुक्तता ही नैसर्गिक शेतीच देवू शकते असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.