Garbage Crisis
sakal
नाशिक: ग्रामपंचायतींकडे संकलित होणारा कचरा साठविण्यासाठी जागेची अडचण आणि प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने निर्माण झालेला नाशिक व इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या कचऱ्याचा प्रश्न आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. या ग्रामपंचायतींचा कचरा महापालिकेच्या विल्होळी येथील कचरा डेपोत पाठविण्यास नाशिक महापालिकाने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे शहरालगतच्या गावांमधील कचऱ्याचा गंभीर प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.