नाशिक- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात ग्रामसेवक संघटनेने औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ५ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेला सध्या अंशतः बदल्यांवर समाधान मानावे लागत आहे.