Financial Literacy Education
sakal
नाशिक: शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये अर्थसाक्षरता यावी, त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने माध्यमिक शिक्षणापासून प्रत्येक इयत्तेत एका धड्याचा समावेश होऊ शकतो. याबाबत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे (आयसीएआय-डब्ल्यूआयआरसी) राज्याच्या शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला असल्याची माहिती आयसीएआय-डब्ल्यूआयआरसीचे अध्यक्ष सीए केतन सैया यांनी दिली.