Nashik Kalaram Sansthan
sakal
नाशिक: पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या घटनेनुसार कोणत्याही विश्वस्तास दोन टर्मनंतर तिसरी टर्म करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सहधर्मादाय आयुक्तांनी दिला. या निर्णयामुळे संस्थान, तसेच कपालेश्वर मंदिरासारख्या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या देवस्थानांवरील विश्वस्त मंडळाच्या नियुक्त्यांबाबतचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.