मालेगाव- शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. शहरात वाहतूक व्यवस्था नाही. अनेक नागरिक व्यवसाय करताना रस्त्याच्या कडेला दुकाने लावतात. महापालिकेतर्फे शहरात अतिक्रमण मोहीम राबविली जाते. मात्र पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. येथील कायद्याचे रक्षकांनीच रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतो.