Elections
sakal
नाशिक: तब्बल साडेतीन वर्षांनंतर मुहुर्त लागलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आरक्षण सोडतीनंतर आता उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यात सख्खे भाऊ, चुलते-पुतणे, चुलतभाऊ यांच्यातच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. ऐन दिवाळीतच उमेदवारांमध्ये चढाओढ रंगल्याने नातेसंबंधात ‘सुरसुरी’ पेटली आहे.