येवला- विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच त्यासाठी शिक्षकाने पोर्टल, ॲपच्या माध्यमातून दिलेला सहभाग, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत सहभाग, प्रकाशित ग्रंथ शाळेच्या हितासाठी मिळविलेला लोकसहभाग अशा क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकाचाच आता आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विचार होणार आहे. कागदांची पोपटपंची नव्हे, तर प्रत्यक्षात केलेल्या कामाची दखलच आता प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक मिळवून देणारी ठरेल.