नाशिक: राज्यात कार्यरत असलेल्या २१ हजार ग्रंथपालांना भविष्यनिर्वाह निधी, अर्जित रजा, वेतनश्रेणी, महागाई भत्ता, निवृत्तिवेतन यापैकी काहीही मिळत नाही. याच कारणामुळे सध्या कार्यरत असलेली ग्रंथपालांची शेवटची पिढी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आले आहे. उच्चशिक्षित असलेल्या या ग्रंथपालांची अवस्था आजच्या घडीला उपेक्षित, वंचित आणि दयनीय होत चालल्याची माहिती राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.