Kuber Jadhav and Pasha Patel
sakal
सटाणा: मुंबई अधिवेशनात मोठ्या दिमाखात स्थापन झालेली राज्याची बहुचर्चित कांदा धोरण समिती गेल्या सहा महिन्यांपासून अक्षरशः अदृश्य झाल्याचा आरोप करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘कुठे गेली रे पाशा पटेलजी तुमची कांदा धोरण समिती?’ असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी केला आहे.