Education
sakal
नाशिक: राज्यातील शिक्षक पदभरतीचा रखडलेला, वेळखाऊ आणि वादग्रस्त कारभार अखेर सरकारने मान्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. सन २०१७ पासून पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात शिक्षण आयुक्त कार्यालय अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली देत राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीचे सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे