Kirit Somaiya
sakal
मालेगाव: राज्यात सर्वाधिक चार हजार ४०० जन्मप्रमाणपत्रे मालेगावात रद्द करण्यात आल्याची माहिती देत भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले मिळविणे हा गंभीर प्रकार असून, संबंधितांची नावे विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारयादीतून वगळावीत, अशी मागणी त्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.