नाशिक- मार्चअखेरसाठी अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना गौणखनिजची वसुली ७० टक्क्यांवर अडकली आहे; तर महसूल वसुलीचे प्रमाण १५१ टक्यांवर पोहोचले. त्यामुळे गौणखनिजातील वसुलीच्या आकड्यांवरून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.