नाशिक- रायगडावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. औरंगजेबाच्या कबरीला समाधी संबोधले त्यामुळे आम्हाला त्यांच्या सोबत सत्तेत जायचे नाही व आवश्यकता नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लबाड्या करून मिळविलेली सत्ता तुम्हाला लखलाभ असो, भ्रष्ट, चोर मंडळींना तुम्हीच सांभाळा, अशी टीका त्यांनी केली.